मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. गेल्या तीन तासांपासून ईडीचे अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
“सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का?”, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करुन केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता असल्याचंही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
“अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापेमारी केल्याचं कळालं. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय आणि ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? ईडी आणि सीबीआय देशातील प्रमुख संस्था आहेत. पण त्यांची आज बदनामी होतेय हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही. काल अनिल परब आणि अजित पवारांच्या चौकशीचा ठराव भाजपनं बैठकीत केला. हे नेमकं कुठलं राजकारण आहे?”, असं संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमया यांचे ट्विट
“सीबीआयला जर तपास करायचा असेल तर सगळ्यात मोठं आणि महत्वाचं प्रकरण म्हणजे अयोध्येतील महापौरांनी अयोध्या ट्रस्टसोबत केलेल्या व्यवहाराची चौकशी करा. ती सीबीआयसाठी एकदम फिट केस आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
Read Also :
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन अकॅडमीसाठी हालचाली!
- आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
- “कधीही ठाकरे सरकार कोलमडेल म्हणून, आजच कामे करून घ्या, असे आघाडीतल्या नेत्यांचे धोरण”
- “फडणवीसांनी आरक्षणाचं श्रेय घ्यावं आणि आंदोलनाचं नेतृत्व करावं, मात्र…” भुजबळांनी केली विंनती