मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबाबत शेतकरी महाराष्ट्र राज्यात आज महाविकास आघाडीकडून आज बंदची हाक दिली आहे. आज पुकारलेल्या बंदला सर्व राज्यात ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप कडून मात्र या बंदला आक्रमकपणे विरोध करण्यात येत आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर आज निशाणा साधला आहे.
बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल
राज्यभरात आज होत असलेल्या बंदला भाजप आणि मनसे कडून विरोध केला जात आहे. अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आज पुकारलेल्या बंदवरून खोचक असा एक प्रश्न विचारला आहे. कोणी मला माहिती देऊ शकेल का? आज वसुली चालू आहे का बंद?, असं अमृता फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत.
मुंबईत बेस्ट’च्या ८ बसेसची तोडफोड; ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण
अमृता फडणवीस या त्यांच्या सोशल मीडिया वर चांगल्याच सक्रीय असतात. तसेच त्या आपलं विविध विषयांवर साडेतोड मत मांडत असतात. आज राज्यभरात असलेल्या बंदवरून अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा धागा पकडून त्याचा आधार घेतला आहे असे दिसून येत आहे.
Read Also :
- पुण्यातील मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – देवेंद्र फडणवीस
- अनिल देशमुखांना मोठा हादरा; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?
- शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले
- एवढाच शेतकऱ्यांचा पुळका असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा – मनसे
- उद्धवजी, शिवसेनेच्या जीवावर राष्ट्रवादी मोठी होत आहे, महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला – चंद्रकात पाटील