राजस्थान कॉंग्रेस सरकारमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. पाय़लट यांना कॉंग्रेस नेतृत्त्वाकडून मनधरणी करण्यात आसली मात्र, तरीही पायलट यांनी बंडाची भूमिका मागे न घेतल्याने अखेर कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई करून पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे. पंढरपूर दौ-यावर असलेल्या जयंत पाटील यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे
माध्यमांनी पंढरपूर दौ-यावर असलेल्या जयंत पाटील यांना महाराष्ट्राच्या स्थितीवर प्रश्न केला. त्यावर महाराष्ट्रात राजस्थान होणे शक्य नसल्याचे एका वाक्यात स्पष्ट उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात राजस्थानसारखे होणे अशक्य असल्याचेही त्यांनी ठामपणे पत्रकारांना सांगितले आहे.
दरम्यान, पायलट उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटरवरुन पहिली प्रतिक्रिया दिली. सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे