मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आले आहे.
मीडियाशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. त्याबाबत विचारलं असता दरेकर यांनी ही कोटी करत दावा केला. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.
राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला. वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
Read Also :
- काँग्रेसने मंत्र्यांचा आदर करावा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडावं – अॅड. प्रकाश आंबेडकर
- उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे कोणाला ठाऊक, ‘देवाला ठाऊक’
- आगामी महापालिका निवडणूकीचा मलिदा चाखण्यासाठी भाजपने पुण्याला खड्यात ढकलले – राष्ट्रवादी
- ग्लोबल टेंडर ‘तुझ्या बापाला’ दिलं; महापालिकेनं रद्द केलं