नाशिक : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यात वाघ आणि त्याच्या मिशीवरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला असून, आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा, “वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी, पुण्यात चंद्रकांत पाटलांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धवजींचे मोदींजींशी जमते, मात्र फडणवीस आणि पाटील यांच्याशी तेवढे का जमत नाही माहीत नाही. पण, मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आम्ही वाघाशीही दोस्ती करू,” असे म्हणत शिवसेनेला डिवचले होते.
यावर राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी, ‘चंद्रकांत दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’ असे प्रत्युत्तर दिले.
तसेच, ‘त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना जर शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ वाटत असेल, तर हिम्मत दाखवून त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडून आता यावे. लक्षात घ्या, पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर या वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,’ असं थेट आव्हान दिलं होतं.
यानंतर, परत चंद्रकांत पाटलांनी, “आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही. हा वाघ जोवर पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोवर आमची दोस्ती होती. मात्र, आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला झाला आहे. किमान संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे’, असं म्हणत राऊतांना डिवचले होते.
Read Also :
- ‘भाजपने सत्य स्वीकारण्याची मानसिकता ठेवाव, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’
- “२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” भाजपचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टोला
- भाजपला मोठा धक्का! एकाच वेळी १५ नेत्यांचा पक्षाला रामराम
- मुख्यमंत्र्यांनी “अब मेरे साथ दो और साथी” म्हटल्यावर, पंतप्रधानांनी लगेच वेळ दिली
- २०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील