पुणे : इंदापूरचे राष्ट्रवादीचे आजी आमदार दत्तात्रय भरणे यांनी, काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आणि ४ वेळचे आमदार हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करुन २०१४ मध्ये ही जागा जिंकली आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले होते. यांनतर एकप्रकारे हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहणच लागले.
भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या पुण्यातील नवीन पक्ष कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना भरणेंनी, “१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी मी माघार घ्यायला राजी होतो, मी पक्षाध्यक्ष पवार साहेबांनाही हे सांगितलं, मात्र ही निवडणूक तुलाच लढवायची आहे आणि हे अजित पवार यांनाही सांगू नका, असं त्यांनी मला सांगितलं,” असा गौप्यस्फोट केला आहे.
राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ शरद पवारांनीच केला का? अशी चर्चा यानिमित्ताने सध्या रंगली आहे. इंदापूरची जागा ही पवार कुटुंबियांसाठी मोक्याची आणि खूप महत्त्वाची आहे. ती बारामतीला लागून आहे आणि तालुक्याचे २०-२५ वर्षे नेतृत्व करणाऱ्या हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबियांच्यात सख्य नाहीये. आता याच जागेबाबत त्यांनी मोठा खुलासा केल्याने, पाटलांच्या इथल्या राजकारणाला खीळ कुणी घातली याच्या चर्चा पुन्हा झडू लागल्या आहेत.
माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन
तसेच यावेळी भरणेंनी, “अजित पवारांना वाढदिवसाची भेट द्यायची असेल, तर तुम्ही पुण्यात राष्ट्रवादीचा महापौर करा,” असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. दुसरीकडे २०१९ मधल्या पराभवानंतर पाटील यांच्या राजकारणाला ग्रहण लागल्यासारखेच झाले. यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला, तर भरणेंच्या गळ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्रिपदाची माळ पडली.
Read Also :
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
- एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
- “आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
- ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले