मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि देशातल्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीवर भाष्य केले असून, ‘भविष्यात भाजपला टक्कर देण्यासाठी नवी मजबूत आघाडी स्थापन करण्याची गरज आहे,’ असं वक्तव्य त्यांनी जळगावमध्ये केलं आहे.
जळगावमध्ये शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ‘सध्या देशातल्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये (यूपीए) किती पक्ष उरले आहेत, हे एकदा तपासून घेण्याची वेळ आली आहे. कारण, भविष्यात भाजपला जर टक्कर द्यायची असेल, तर देशाला नवी मजबूत आघाडी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, देशातील प्रादेशिक पक्ष आणि भाजप विरोधकांची एकत्र मोट बांधून एक भक्कम आघाडी तयार करणे गरजेचे आहे,’ असं मत त्यांनी मांडलं आहे.
तसेच यावेळी त्यांनी, ‘विरोधी पक्षांची ही आघाडी काँग्रेस पक्षाशिवाय मात्र पूर्ण होऊ शकत नाही,’ असे उद्गार काढले आहेत. ‘काँग्रेस हा पक्ष आता दुबळा झाला असला, तरी आजही देशातील तो एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. देशातल्या केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये काँग्रेसची अजूनही चांगली ताकद आहे. त्यामुळे भक्कम विरोधी पक्ष उभा करण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी गरजेची आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातल्या बैठकीनंतर, आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावरुनच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपतील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही’ – संभाजीराजे
- आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी, सोलापूरचे पालकमंत्री पद नकोच, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती
- स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, “आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!”; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘संभाजीराजेंना मान्य नसले तरी ते भाजपचेच, कागदावर का होईना खासदार आहेत’
- ‘आगामी महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर जिंकू’