नांदेड – ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना महादेव जानकर जोरदार टक्कर दिली होती. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा बारामतीतून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मी आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
नांदेड येथे पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार राष्ट्रीय स्तरावर केला जाईल. आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही लढवणार आहोत. परभणी, सांगलीत आम्ही मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. मी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा परभणी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आमच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात खते कसे उघडता येईल यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहे. संघटना कशाप्रकारे वाढवता येईल यासाठीही आमचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही आमचे दौरे सुरु आहेत. मी स्वत: परभणीमधून स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजयदेखील मिळवू, असा दावाही जानकर यांनी केला.
मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने
दरम्यान, लोकसभा निवडणुकीला अदयाप दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र जानकर यांनी आतापासूनच परभणीतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत एका प्रकारे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र परभणी मतदारसंघ शिवसेनेच्या हातात आहे. या जिल्ह्यावर शिवसेनेचे मोठं वर्चस्व आहे. त्यामुळे रासपने दिलेलं आव्हान किती तगडे असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also:
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं