सातारा: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करण्यात आलेला होता. त्यानंतर कारखाना खासगीरित्या विकत घेतला होता. कारखान्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला होता. jarandeshwar sugar factory latest updates
हे पण वाचा, उभारणीपासून ते आतापर्यंत चर्चेत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ‘१८ वर्षांची’ अशी आहे लढाई
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कर्जाच्या घोटाळ्यापोटी सक्तवसुली संचालयाने जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे मात्र यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे अंदाजे १४ लाख मेट्रिक टन गाळपाची नोंद करण्यात आलेली आहे. आता कारखान्याची मालमत्ता जप्त झाल्यास कामगार आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी करायचे काय? हा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी जरंडेश्वर कारखान्याने जिल्ह्यातील सर्वाधिक उसाचे गाळप केले होते मात्र आता कसे होणार याकडे शेतकरी आणि ऊस पुरवठादार विचारत आहेत.
हे पण वाचा, जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
ज्यावेळी जिल्ह्यात १५ कारखान्यांनी ११९ लाख मेट्रिक टन गाळप केले तेव्हा एकट्या जरंडेश्वर कारखान्याने सार्वधिक असे १४ लाख मेट्रिक टन एवढे विक्रमी गाळप केले. दैनंदिन २५०० क्षमता असलेला हा कारखाना अल्पावधीत १० हजार मेट्रिक टन गाळप करू लागला. गेल्या पाच ते सहा हंगामात समाधानकारक दार दिल्याने जरंडेश्वर कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. मात्र जर कारखाना बंद राहिला तर जिल्ह्यातील १३ ते १४ लाख मेट्रिक टन ऊस जाणार कोठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.
हे पण वाचा,
“जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
“अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे