पुणे : काही दिवसांपूर्वी उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून सोलापुरातील राजकारण तापले होते. यावरून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी झालेली नाही, असे ते म्हणाले.
उजनी पाणी प्रश्नाचा वाद मागेच मिटला आहे. दत्तात्रय भरणे हेच सोलापरूचे पालकमंत्री राहतील, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला सोलापुरात जोरदार विरोध करण्यात आला. विरोधानंतर अखेर उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता.
Read Also :
- कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
- आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’