सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचं गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अनेक राजकीय दिग्गजांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. याच विषयावर विवादित संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना त्यांना धमकी दिल्याच बोललं जात आहे तसेच त्यांचा एकेरी उल्लेख देखील केल्याचे समोर आले आहे.
या चर्चेत बोलत असताना अर्णब यांनी पुढच्या चर्चेत बघून घेईन असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी दिली आहे.यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
आव्हाड यांनी ट्विट करत नाव न घेता गोस्वामी यांना खडे बोल सुनावले आहेत तर अशा प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान करणारे असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये –
ज्या भाषेत मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध इंग्रजी आणि हिंदी चॅनेल मधील एका पत्रकाराने भाष्य केलं ते निंदनीय तर आहेच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं अपमान करणार देखील आहे. सत्य सामोरे येईल याबाबत शंका नाही.
सत्य हे मिडीयाच्या माध्यमातून सामोरे आणले जात आहे हे भासवणे हा अत्यंत गलिच्छ राजकारणाचा प्रकार आहे.
ह्या पत्रकाराला चर्चेत राहण्याची सवय असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध असे उदगार काढले आहेत. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करेल
ज्या भाषेत मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध इंग्रजी आणि हिंदी चॅनेल मधील एका पत्रकाराने भाष्य केलं ते निंदनीय तर आहेच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं अपमान करणार देखील आहे. सत्य सामोरे येईल याबाबत शंका नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2020