मुंबई : मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC मैदानात लढायला नव्हते. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भापचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
“चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित,”सन्मान सावित्रीच्या लेकींचा”या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर टीका केली. आव्हाड यांच्या या वक्तव्याला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले. पडळकर म्हणाले, “आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही. पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला आणि वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होतं. हा ओबीसींचा इतिहास आव्हाडांना माहीत नाही का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
“मागचं दीड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सध्या ते काय करत आहेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत,” अशी टीका आमदार पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ना न घेता केली.
Read also:
- नितेश राणेंना मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश
- अस्तित्व टिकविण्यासाठी आढाळराव पाटील घुटण्यावर; राष्ट्रवादीकडून शिरूरमधील शिवसेना संपविण्याचा डाव?
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना धक्का; बँकेच्या विजयाचा गुलाल घेत ठरले ‘श्रीमंत अपात्र मजूर’ उमेदवार
- सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल
- राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत