मुंबई : पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस रणनितीदेखील आखत आहे. पण त्याचवेळी पक्षांतर्गत मतभेद देखील वाढत चालले आहेत. मुंबई काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
मिशन विदर्भ: शरद पवारांनी कंबर कसली; उद्यापासून चार दिवस विदर्भात तळ ठोकणार
वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांची सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळातून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा आपण शिष्टमंडळात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपला जाहीर अपमान केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
‘आमदार असो कोणी असो इथून चालता हो’ अशी भाषा वापरल्याचा पत्रात उल्लेख आहे. आपण याबाबत तिथेच भाई जगताप यांना विचारणा केली असता आपला पुन्हा अपमान करण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. मी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष असताना चारचौघात आपला अपमान केला असं सिद्दिकी यांचं म्हणणं आहे. भाई जगताप आणि झिशान सिद्दिकी यांच्यात यापूर्वी सुद्धा वाद झाले आहेत.
Read Also :
- ‘प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी’; बाळासाहेब थोरात करणार भाजपशी चर्चा
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
- केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा