भंडारा : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन सभेतून बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करीत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. यातच आता भंडारा येथे झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे
एक काळ होता, जेव्हा नागपुर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपुर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपुर्वक परेशान, हैराण करायचे, त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात केली आहे. अशी टिका सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे.
“सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
मागील काही दिवसापासून राज्यात शिवसेना आणि बंडखोर आमदार, भाजप यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता सुषमा अंधारे यांनी थेट नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता भाजपकडून सुषमा अंधारे यांना कशापद्धतीने प्रत्युत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
- “मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
- अजब प्रेम की गजब काहाणी.! 2 जुळ्या बहिणींनी एका तरूणासोबत लग्न केल्याने गुन्हा दाखल..! महिला आयोग चौकशी होणार?
- “आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका
- “शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात