औरंगाबाद : जनतेच्या कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भिडणाऱ्या नेत्यांमध्ये काही नावं अग्रेसर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला.
साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला.
अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला दम भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
हॅलो,
तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र का दिले नाही?
ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ
नाही केलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर असं चालेल का काहीतरी
तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. मृत्यू-जन्म सर्टिफिकेट हे देणं हे आपलं कर्तव्य आहे.
तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आहे, असं नाही चालणार
मला कॉपी पाठवा बस्स, मला बाकी काही सांगू नका. तात्काळ कॉपी पाठवा. (फोन ठेवला)
त्यानंतर अब्दुल सत्तार उपस्थितांना म्हणतात, काय काम करतात हे, मृत्यू प्रमाणपत्र देत नाही म्हणजे किती बोगस लोक आहेत, राजकारण कुठे करावं याची पण एक सीमा असते.
मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून शेतकरी हमसून हमसून रडल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शिवना नदीच्या काठावरील गावात अब्दुल सत्तार पाहणी करत असताना हा प्रकार घडला आहे. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे दुःख सहन न झालेल्या शेतकऱ्यांनी पाहणीसाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला सुरुवात केली. तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. शेतकऱ्यांचा रडतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुरामुळे शेतीचे किती अतोनात नुकसान झालंय याचा अंदाज येतोय.
Read Also :
- प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली; ‘त्या’ तक्रारीत तथ्य नाही!
- राज्यातील ‘असुरक्षित’ सावित्रीच्या लेकींसाठी अखेर मुख्यमंत्री आले धावून
- ‘धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा,’
- ‘मुश्रीफांसाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी,’ पाटलांचा जोरदार टोला