26 जुलै 1999 ला भारताने पाकिस्तानला धडा शिकवत कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. आज 21 व्या कागरिल विजय दिनानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे.
करगिल विजय दिवस भारत के स्वाभिमान, अद्भुत पराक्रम और दृढ़ नेतृत्व का प्रतीक है। मैं उन शूरवीरों को नमन करता हूँ, जिन्होंने अपने अदम्य साहस से करगिल की दुर्गम पहाड़ियों से दुश्मन को खदेड़ कर वहाँ पुनः तिरंगा लहराया। मातृभूमि की रक्षा के लिए समर्पित भारत के वीरों पर देश को गर्व है। pic.twitter.com/mD9Ged8Pkz
— Amit Shah (@AmitShah) July 26, 2020
हा दिवस भारताच्या स्वाभिमान, अद्भूत पराक्रम आणि दृढ नेतृत्वाचे प्रतिक असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, कारगिल विजय दिवस भारताच्या स्वाभिमान, अद्भूत पराक्रम आणि दृढ नेतृत्वाचे प्रतिक आहे. मी त्या शूरविरांचे अभिवादन करतो, ज्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर कागरिगलच्या दुर्गम डोंगरात शत्रूला पळवून लावत तेथे पुन्हा तिरंगा फडकवला. मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या वीरांचा देशाला अभिमान आहे.
On the 21st anniversary of Kargil Vijay, I would like to salute the brave soldiers of the Indian Armed Forces who fought the enemy under the most challenging conditions that the world had witnessed in the recent history. #CourageInKargil
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट करत जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी ट्विट केले की, संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो.