जळगाव – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यभरातील विविध ठिकाणच्या निवडणूकांमध्येही तिन्ही पक्षांची एकजूट पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जळगाव जिल्हा बँकेवरही आपला झेंडा फडकविला. त्यामुळे भाजपला अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजप आपली ताकद दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकारणाशिवाय सहकार नाही हे चित्र राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे जळगावमध्येही दिसून आले आहे. राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाची बँकेवर सत्ता येते. मागील निवडणूकीवेळी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, त्यावेळी तत्कालिन भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी नेतृत्व करून सर्वपक्षीय यश मिळविले होते. पण त्यात भाजप आणि शिवसेनेचे संचालक जास्त होते. त्यामुळे अध्यक्ष भाजपचा होता, पर्यायाने भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. मात्र आता चित्र बदलले आहे .
‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकवर सत्ता स्थापन केली. या निवडणुकीसाठी खडसे यांनी युद्ध पातळीवर तयारी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा जिंकता आल्या. भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र ऐन वेळेवर भाजपने ‘बहिष्कार’ टाकण्याचा मुलामा देवून एक पाऊल निवडणूकीतून माघार घेतली.
यामुळे महाविकास आघाडीला या निवडणूकीतून बळ तर मिळालेच परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक ताकदवार झाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही आपले जिल्ह्यात आजही वजन आणि नेतृत्व असल्याचे दाखवून दिले आहे. याचा फायदा शिवसेना आणि काँग्रेसलाही झाला.
राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
या राजकीय घडामोडीनंतर येत्या काळातील जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडी झाल्यास भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यासमोर आता आव्हान असणार आहे. आता जिल्हा परिषदेवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजपला जोरदार मोर्चेबांधणी करावी लागेल. पण सध्या तरी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे तीन पक्षांना राजकीय बळ मिळाले आहे, हे विशेष.
Read Also :
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार