मुंबई : देशातील महामारीची स्थिती अजूनही नियंत्रणात नाही. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. तसेच, ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवत आहे. मात्र, कडक लॉकडाऊन मुंबईमध्ये मात्र रुग्णसंख्या कमी होत असून, मुंबई महापालिकेने महामारीच्या आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थापनाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेतली आहे.
दरम्यान, लसींच्या बाबतही आता मुंबई महापालिकेने पाऊल पुढे टाकले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, “लसींसाठी (ग्लोबल टेंडर) जागतिक निविदा काढणारी मुंबई महापालिका जगात पहिली ठरली आहे. याची अंतिम तारीख ही १८ मे असून, आदेश निघाल्यानांतर संबंधित कंपन्यांना कमीत कमी ३ आठवड्यांच्या आत लस द्याव्या लागतील. त्यांना आयसीएमआर आणि डीसीजीआयची मार्गदर्शक तत्वे देखील पाळावी लागतील”, असं त्यांनी सांगितलं.
तसेच, आवश्यक असल्यास कंपन्यांनी त्यांचे शीतगृह स्थापान करावे. मात्र, लसींची कार्यक्षमता आमच्या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये दिल्यानुसार ६०% पेक्षा कमी नसावी. या सर्व प्रक्रियेसाठी कोणालाही आगाऊ देय मिळणार नाही. वेळेवर लस देण्यात न आल्यास आम्ही कंपन्यांना दंड करू,” असं देखील त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
Read Also :
- उद्धव ठाकरे मुंबईचेच मुख्यमंत्री का?; उपदेशाचे डोस देणारे शरद पवार कुठे आहेत!
- सामान्य माणसाच्या विरोधात लढण्यासाठी, आघाडी सरकार देतंय वकीलाला अडीच लाख रुपये!
- सामान्य माणसा “तूच तुझा सांगाती”, वसुली सरकारवर विसावला त्याचा कार्यभाग बुडाला
- अखेर लॉकडाऊनमध्ये वाढ, जारी केली नवी मार्गदर्शक तत्वे
- अजित पवारांनी रद्द केला आपल्याच सरकारचा “उधळपट्टी”चा निर्णय