उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला पोलिसांनी उज्जैन येथून अटक केले होते. मात्र आता विकास दुबे पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहेया एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे.
विशेष सरकार वकील उज्वल निकम यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. कुख्यात गुन्हेगार विकास दुबे हा पोलीस एन्काउंटर मध्ये मारला गेला हि अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु दुर्दैवाने या घटनेवर काही व्यक्ती राजकारण करत आहेत असे त्यांचे मत आहे.
उज्वल निकम म्हणाले, “कुख्यात गुन्हेगार विकास दुबे हा पोलीस एन्काउंटर मध्ये मारला गेला. परंतु दुर्दैवाने या घटनेवर काही व्यक्ती राजकारण करत आहेत. अर्थात पोलीस एन्काऊंटर झाल्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार यावर चौकशी होईल पण तो पर्यंत पोलिसांचे मनोधर्य तोडू नये कारण जरी आज काही लोकी म्हणत असले कि विकास दुबे पोलिसांना शरण आला होता मग शरण आलेली व्यक्ती पोलिसांवर गोळीबार का करेल? परंतु त्या लोकांना हे माहित नाही कि विकास दुबे हा सराईत गुन्हेगार होता. त्यामुळे दुबे याचा एन्काउंटर झाला याचा सामान्य लोकांना देखील आनंद झाला आहे मात्र हा एन्काउंटर खरा होता कि खोटा याचा निकाल न्यायालय नक्कीच लावेल”