मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागला आहे. उशीरा का होईना पण शपथविधी झाला आणि राज्यात मंत्रिमंडळ मिळाले. आता राज्य सरकारने लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांपासून इतर घटकांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटूनही मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त मिळत नव्हता. उशीरा का होईना पण शपथविधी झाला आणि यातून महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळाले. आता राज्य सरकारने लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांपासून इतर घटकांचे अनेक प्रश्न सोडवावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच ज्यांना क्लीनचिट मिळाली नाही अशा नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले नसते तर बरं झालं असतं, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला चिमटा काढला.
एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल ३६ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. जवळपास महिनाभर राज्यात एकही मंत्री नव्हता. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी झाले नाही. मात्र उशीरा का होईना शपथविधी झाला आहे. आता शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा महाराष्ट्रात संकटात असलेला आमचा शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने धाव घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप करून आणि पालकमंत्री नेमून त्यांना जिल्ह्याजिल्ह्यात पाठवतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
तसेच शिंदे यांच्यासोबत जे ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे. त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी मारली. यासोबतच काही चुकीच्या प्रकरणांमध्ये नाव असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हा सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. जेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होईल, तेव्हा आम्ही सभागृहात आमची भूमिका मांडू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?