औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना टोले लगावले. मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं रावसाहेब दानवे सत्तारांना उद्देशून म्हणाले. अब्दुल सत्तार खूप झालं, ५० कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता २४०० कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी दिलं.
चिरीमिरीचं नाही खेळावं. गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपादाचा भार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच १७ ऑगस्ट रोजी औरंगाबादेत दाखल झाले. मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो, माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला त्यांनी माझा सत्कार केला, मी कार्यकर्त्यांच्या बळावर मी इथपर्यंत पोचलो, मलाही आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
टेंडर ऑफलाईन अन् पालिकेची सभा ऑनलाईन का? काँग्रेस नेते आबा बागुलांचा भाजपला रोखठोक सवाल
मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता, जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं, मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो, तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला ३ तासात आपण पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
Read Also :
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात
- डॉ. स्वप्नील शिंदेंची आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, शासनाचे चौकशीचे आदेश
- उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
- अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार