बीड : गेल्या काही दिवसांपासून गॅस-इंधन दरवाढीमुळे मोदी सरकारवर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. मात्र, भाजप नेते दुसरीकडे पंतप्रधानांचा उद्धार करताना दिसून येत आहेत. त्याचीच प्रचिती बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त एका कार्यक्रमात आली. या कार्यक्रमाला खा. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, पंतप्रधानांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो,’ असं वक्तव्य त्यांनी केलं.
कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
तसेच, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील चांगलाच हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मी आवाहन करू इच्छिते की, अतिशय भ्रष्ट असलेल्या राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला आपण मुक्तीकडे नेऊ. यावेळी त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर देखील टीका केली. ‘रस्त्याच्या कामांचा कोण पाठपुरावा करतंय आणि कोण कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून काम केल्याचा आव आणतंय, सगळ्यांना माहीत आहे,’ असं त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण
‘एक नवीन प्रयोगच जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढल्या जातात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटामाटात संपन्न. पण जो रस्ताच यांच्या अख्त्यारीतच येत नाही त्याच्या बातम्या येतात. यापेक्षा श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते, तर मी समजून घेतलं असतं,’ असा देखील टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंडेंना लगावला. ‘दोन्ही बाजूने बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त करत, भाजप बीड काबीज करणार असल्याचेच संकेत दिले.
Read Also :