मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना राजकीय नेते मंडळी एकमेंकावर आरोप प्रत्येआरोपाची झोड उढवण्यात मगशूल आहेत. जनता आपला जिव मुठीत घेऊन जगत आसताना एकही संधी सोडत नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद खिल्ली उडवणारी होऊ नये, या उद्देशाने त्यांनी पत्र लिहित असल्याचे सांगितले आहे.
शेतकरी कायदे रद्द करा आणि तसं केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असं आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे?, असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात मी आपणाला पत्राद्वारे काही सवाल केले आहेत. याचे पण उत्तर देणार का? असे पडळकर म्हणालेत.
मा. बाळासाहेबांनी ज्यांच्याशी हयातभर संघर्ष केला, ज्यांची पाकधार्जिणा म्हणून खिल्ली उडवली,अशांसोबत मा.मु. आपणही पंतप्रधान #मोदीजींविरोधात सूर आवळताय व पत्र लिहताय. पण महाराष्ट्राच्या संदर्भात मी आपणाला पत्राद्वारे काही सवाल केले आहेत. याचे पण उत्तर देणार का? #किंबहूना देणार का? pic.twitter.com/OuaGXEOkKz
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 15, 2021
गोपीचंद पडळकर पत्रात म्हणाले की, आपण काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली, या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकाना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल यांच्या टाकत आपण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. ज्या बारा नेत्यांनी हे पत्र दिले आहे. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याशी ह्यातभर लालबाग, परळपासून मराठी पट्टयात संघर्ष केला आणि मराठी माणसाला आपल्या झेंड्याखाली आणले. तसेच आपले मार्गदर्शक अर्थातच शरद पवार आहेत. ज्यांची खिल्ली बाळासाहेबांनी पाकधर्जिणा म्हणून अनेकदा उडविली ते फारुख अब्दुल्लादेखील आहेत. अशी नोंद इतिहासाने तुमच्याबद्दल घेऊ नये म्हणून मी पत्राच्या माध्यामातून मुख्यमंत्री म्हणून तुमच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला करवून देत आहे असा टोला त्यांनी लगावला.