मुंबई : राज्याच्या राजकारणाचे मंदिर असे समजले जाणारे आणि राज्याचा गाडा जिथून हाकला जातो. त्या मंत्रालयात सर्वसामान्यांना तपासीणी केल्याशिवाय आणि योग्य ओळखपत्र, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र त्याच मंत्रालयात घडलेला एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला असून, मंत्रालयात चक्क मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या खच सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून, कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढिग पडल्याचे दृश्य कैद झाले आहे. विशेष म्हणजे, हा ढीग मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस सापडला असल्याने, सुरक्षा यंत्रणांचा एवढा मोठा आणि २४ तास पहारा असूनही एवढया मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कुठून?, आणि यामागे कुणाचा वरदहस्त आहे?, ही दारु रिचवणारे महाभाग नेमके आहेत तरी कोण? असे सवाल उपस्थित होत आहेत.
मंत्रालयात आढळून आलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत मा. @mipravindarekar यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पत्र लिहिले असून, पत्राची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.@CMOMaharashtra pic.twitter.com/zS4oVYTGKD
— OfficeOfPravinDarekar (@officeofPD) August 10, 2021
या पार्श्वभूमीवर आता भाजपने, मंत्रालयात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, तसे पत्र मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी दिले आहे. तसेच, “उजेडात आलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा आणि प्रशासनला मान खाली घालायला लावणारा असून, सामान्य जनतेला जिथे अगदी काटेकोरपणे तपासणीतून जावे लागते, तिथे या बाटल्या आत गेल्याच कशा?” असा सवाल त्यांनी केला आहे.
मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा?
आघाडी सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे?
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे! pic.twitter.com/VPkKg1Y1z6— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 10, 2021
तसेच, “एवढ्या मोठ्या प्रमाणावर या बाटल्या आत कशा पोहोचल्या?, त्या कोठून आल्या?, कोणी आणल्या?, आत कुणी कुणी हे मद्य प्राशन केले?, या सगळ्या प्रश्नांची गंभीरपणे चौकशी करून त्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या नेतृत्वात, सामान्य प्रशासन विभाग आणि अन्य संबंधित विभागांच्या प्रमुखांच्या समितीमार्फत, या प्रकरणाची १५ दिवसांच्या आत चौकशी करावी आणि याचा अहवाल व केली कारवाईची माहिती जनतेसमोर खुली करावी”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Read Also :
- “मग हा टाइमपास कशाला?”; सुप्रिया सुळेंवर निलेश राणे यांचा जोरदार घणाघात
- अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण
- टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा, यंदाही साधेपणानेच करावे लागणार सण साजरे
- “आता भाजपा कार्यकर्त्याला कुणी हात लावला, तर….”, भाजपा नेत्याच्या विधानावरून वादाची ठिणगी
- सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर