मुंबई : आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातला लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातला सध्या लागू असलेला लॉकडाऊन हा सरसकट हटवला जाणार नाही, मात्र त्यात काही प्रमाणात शिथीलता आणण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आज झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तसेच, मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं एकमत लॉकडाऊन लगेच काढणं शक्य होऊ शकणार नाही, यावर झालं. राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच, आजच्या बैठकीत तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, १ जून नंतर काय असतील नियम, या संदर्भातली नवी नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली. तसेच, ग्लोबल टेंडरमध्ये मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. यापैकी काही कंपन्यांनी किंमत दिली आहे, तर काही कंपन्यांनी किमतीबाबत काहीच स्पष्ट कल्पना दिली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या केंद्राकडून कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या ३ लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. बाकी इतर लसींना परवानगी देण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. त्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.
Read Also:
- ‘आघाडी सरकार जनता झोपेत असताना नाही, तर लोकांसमोर निर्णय घेते’
- ‘भाजपचा आरक्षणाचा कळवळा केवळ दिखाऊ आणि भूमिका दुतोंडी’
- ४-४ वेळा पत्र लिहून भेट दिली नाही हे सांगता, याआधी ४० वेळा भेट झाली ते का नाही सांगत?
- ‘पवार साहेब! मुख्यमंत्री, विरोधी पक्ष आणि नारायण राणे यांना एकत्र आणा’ – संभाजीराजे
- लॉकडाऊन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय