मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाणावर हक्क नेमका कुणाचा? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात सध्या दोन्ही बांजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांना विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून चांगलच बळ मिळत आहे. सध्या अनेक पक्षाचे नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचीच चर्चा सुरू आहे.
“शिंदेंचा दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला, पण त्यात ‘एक निष्ठ’ शब्द राहून गेला”; सुषमा अंधारे
आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज पोहरादेवीची यात्रा आहे तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संपुर्ण राज्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास घडविणे फक्त शिवसेनेलाच शक्य आहे. हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी शिवसेनेते प्रवेश केला आहे. असं सुनील महाराज म्हणाले.
वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत..! मेळाव्यासाठी शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
अलिकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा परदेशी, मा.पंचायत समिती सदस्य सुनिल ढवळे, मा. उपसभापती (पंचायत समिती, खेड) अमोल पवार, खेड येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल येवले, खरेदी विक्री संघाचे संचालक चेतन बोजे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल यांचा दाखला देत फडळकरांचा सुळेंना टोला; म्हणाले..
दरम्यान, उमरगा येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे, धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती शाम जाधव नगरसेवक प्रदीप घोणे, गणेश खोचरे, पंकज पडवळ, नाना घाडगे, महेश काटे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी उपमहापौर, स्व. डॉ. राम. बारोट यांचे चिरंजीव नीरव बारोट यांनी देखील शिवसेनेत आज प्रवेश केला.
Read also
- इकडे आड तिकडे विहिर..! प्रताप सरनाईकांसाठी भाजपचा नवा डाव, शिंदेंनी हात झटकले
- वडेट्टीवारांनी कोवीड काळात मृतदेहांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं..! भाजपचा वेढा आता काॅंग्रेसच्या नेत्यावर
- बिगबॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल; गुलाबराव पाटील
- “मिंधे गटाची पहिली विकेट गेली, अशा 40 पैकी 39 विकेट जाणार”; रूपाली पाटील
- “ED पासून सुटका व्हावी म्हणून BJP मध्ये गेले, पण शेवटी भाजपने इडी भीती घातलीच”