मुंबई : राज्यात रेमेडिसिवीर इंजेक्शन्स आणि लसींच्या तुटवड्यावरून सावळा गोंधळ सुरु आहे. केंद्र सरकार आणि राज्यात सरकारमध्ये यावरून सातत्याने आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्यातले विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये देखील सातत्याने खडाजंगी सुरु आहे, असे असतानाच आता राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर लस वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केला जात आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, पदाचा (गैर) वापर करुन राज्याला मिळालेल्या प्रतिबंधात्मक लसींच्या डोसेसपैकी जास्तीत जास्त डोस, पालकमंत्री असलेल्या स्वतःच्या जालना जिल्ह्याला मिळतील अशी व्यवस्था केली असल्याचा आरोप करणारी बातमी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
महामारीच्या काळात जानेवारी २०२१ मध्ये जालना जिल्ह्यात ४ हजार ७९४ जणांना लसचे डोस देण्यात आले. फेब्रुवारी २०२१ मध्ये जालना जिल्ह्यात १२ हजार १६ जणांना लसचे डोस देण्यात आले. मार्च २०२१ मध्ये ५३ हजार ८५ जणांना लसचे डोस देण्यात आले. एप्रिल २०२१ मध्ये १ लाख ३४ हजार २९० जणांना लसचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, या बातमीचा दाखला देत यामागील सत्य शोधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त सचिव विकास शील यांनी यासंदर्भातले पत्र लिहून, महाराष्ट्र शासनाकडून अहवाल मागितला आहे. तसेच, या पत्रात कोविन ऍपवरील आकडेवारीचा देखील संदर्भ देण्यात आला आहे.
Read Also :
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल
- पंढरपूरनंतर आता अजून एका जागेसाठी होणार विधानसभा पोटनिवडणूक
- प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण