गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढला होता. मात्र आकडेवारीवरून हा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. सोबतच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. काल राज्यात कोरोनामुक्त होण्याचा उच्चांक गाढला असून, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 10,333 कोरोना रुग्ण बरे झाले आहे.
राज्यात आज १०,३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २,३२,२७७ झाली आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 28, 2020
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली की, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.34 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 2,32,277 एवढी आहे.
दरम्यान, राज्यात सध्या 1,44,694 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 19,68,559 नमुन्यांपैकी 3,91,440 नमुने पॉझिटिव्ह आहे. राज्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 8 लाखांच्या पुढे असून, राज्यातील मृत्यूदर 3.62 टक्के एवढा आहे.