मुंबई : महाराष्ट्रात मार्चच्या अखेरीस कोरोनारुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र कडक निर्बंधांमुळे आता राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सुरुवातीला असलेला लसीकरणाचा वेग देखील आता लसींअभावी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे, असे असताना देखील महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असून, राज्याने 2 कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
#MahaVaccination pic.twitter.com/HmkgUnQf76
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 18, 2021
महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.69% झाले आहे. कूण 49,27,480 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 4,19,727 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Read Also :
- ‘काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन…’, चंद्रकांत पाटलांचे कळकळीचे आवाहन
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’
- ‘भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष’
- ‘…तेव्हा विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’
- महिन्याभरातच लसीचा दुसरा डोस घेतला? राजेश टोपे म्हणाले…