मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय अशांतता आणि द्वेषपुर्ण वक्तव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशोरे ओढले. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे. तर काॅंग्रेसने देखील यावर जोरदार टिका करत हेट स्पीच देणाऱ्या व्यक्तींवर राज्य सरकार कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
महाराष्ट्रातील सध्याच्या काही हिंदू संघटनांच्या सभांमधून एका पत्रकाराने महाराष्ट्र सरकार कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायाधीशांनी टिप्पणी देतांना म्हटले की, हे सगळं घडतंय कारण राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही, जर हेच सगळं घडत असेल, तर मग आपल्याला कोणत्याही राज्य सरकारची गरज काय आहे. अशा शब्दात न्यायालयानं सरकारलं फटकारलं.
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड
सर्वोच्च न्यायालयानं या सरकारला नपुंस सरकार म्हटलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का ? हा सरकारचा कमीपणा नाही का ? आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने ४ आठवडे तेच सांगत होतो की आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. अजून त्यावर निकाल लागलेला नाही. त्यावर बोललं तर सरकारमधल्या प्रमुखांना वाईट वाटतं. आता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि इथल्या सरकारला सर्वोच्च न्यायालय नपुंसक म्हणतंय. कारभार कशाप्रकारे चालतोय कुणास ठाऊक, आता दोष कुणाला द्यायचं, त्याचं आत्मपरिक्षम त्यांनी करावं. असं अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”
दरम्यान, हेट स्पीच प्रकरणी योग्य कारवाई न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खोके सरकारवर नपुंसक म्हणून ताशेरे ओढले आहेत. हेट स्पीच देणारे भाजप आणि शिंदे गटाची राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी येतात, म्हणून यांच्यावर सरकार कारवाई करत नाही का ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
Read also
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरण..!”राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप अन् शिंदे गटाने दंगल घडवली”
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे