मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने तूर्तास तरी स्वबळाच्या नारा दिला असून, त्यावरून सत्तेतील इतर मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढत असलेली दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी, “स्वबळावर लढणे हाच पक्षाचा अजेंडा आहे,” असं भाष्य पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
“महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि आम्ही जी दिशा घेऊन काम करत आहोत, त्यावरुन राज्यात ‘काँग्रेस’ हीच नंबर १ ची पार्टी आहे, भविष्यात आणि येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत त्याचे परिणाम तुम्हाला नक्की पाहायला मिळतील,” असं म्हणत, “भाजपला आज देशात फक्त काँग्रेस पर्याय आहे. भाजप सरकारने देश विकायला काढला आहे. त्यामुळे, २०२४ला राहुल गांधींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार तयार होईलच,” असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.
“निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”
तसेच, स्वबळाच्या नाऱ्यावर परत एकदा विचार केला जाणार आहे का? या प्रश्नावर त्यांनी, “नाही, याबाबतचा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल, पण मी एवढंच सांगेन की, पवार जे बोलले, तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्ये देखील घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय़ होता. तेव्हा आता आमच्या पक्षाचं काय करायचं याबद्दलचा निर्णय, हा आम्ही घेऊ, ती आमच्या पक्षाची रणनीती असेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
- ”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
- ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका!
- फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला
- “मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत” – पी. चिदंबरम