मुंबई : कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिक माणसांवर होणाऱ्या अन्यायाकडे, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भागात, मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक राहतात. त्यांच्यावर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून, त्यांची ही कृती अन्यायकारक आणि मानवताविरोधी आहे”, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
“सीमाभागात मराठी भाषिक नागरिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबला पाहिजे. ती गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधांनांनी पुढाकार घ्यावा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन आता ६० हून अधिक वर्षे उलटली आहेत. तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील शंभरच्या वर मराठी भाषिक गावे अजूनही राज्याबाहेर आहेत”, याकडे त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधलं.
सीमाभागातील बांधवांना न्याय मिळावा यासाठी येथील मराठी नागरिक पत्रे लिहून पंतप्रधानांना विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील या मागणीला पाठिंबा देत असून त्यांची मागणी मान्य करावी, अशी विनंती @AjitPawarSpeaks यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.
— NCP (@NCPspeaks) August 11, 2021
मुंबईतील हॉटेल, मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार?, पालकमंत्र्याची महत्वपुर्ण माहिती
यावेळी, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची लढाई ही आता जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. यात सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि राज्याची बाजू न्यायाने उचित असल्याने, दोन्ही लढाईत महाराष्ट्रच विजयी होईल. पण हा प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लावून, सीमाभागातील मराठी बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत,” असेही त्यांनी म्हटले.
सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री @AjitPawarSpeaks यांनी व्यक्त केली आहे.@PMOIndia
— NCP (@NCPspeaks) August 11, 2021
महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव
तसेच, “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. आपण कित्येक वर्षांपासूनची मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी आणि बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न पूर्ण करावे. महाराष्ट्र सरकार व जनतेचाही हाच दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही”, असेही त्यांनी पत्रात शेवटी नमूद केले आहे.
Read Also :
- राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही? नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?
- राज्यात तोंड उघडणारे दानवे-राणे, मराठा आरक्षणावर संसदेत तोंड का उघडत नाहीत? राऊतांचा संतप्त सवाल
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला
- “आरक्षणावर बोलण्याची संधी दिली जावी,” छत्रपती संभाजीराजेंची उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी