मुंबई : सध्या राज्यात, आगामी काळात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली असून, यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आणि भाजपने याआधीच स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. यातच, आता महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार असल्याची तयारी सुरु असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.
हे पण वाचा, “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, राष्ट्रवादी भवनच्या उदघाटनाला तुफान गर्दी
२०१४ ला सत्तेत आलेल्या युतीच्या सरकारने, त्यांना सोयीसारकर पडेल अशा पद्धतीने महापालिकां निवडणूकांच्या प्रभागांची रचना केली, असा आरोप तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आघाडीने केला होता. तसेच, यावरून वादंग उभेच राहिले होते. मात्र, या निर्णयाला युतीच्या सरकारने मागे घेतले नाही. याचा फायदा देखील त्यांना त्यावेळच्या महापालिका निवडणुकांमध्ये झालेला पाहायला मिळाला.
हे पण वाचा, भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
मात्र, राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार आलं, यात तीन पक्ष असल्याने तिन्ही पक्षाच्या संमतीने आता, महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार असल्याआसांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीचा भाजपला अडकवण्याचा प्रयत्न यातून दिसून येत असून, याला भाजप कसा प्रतिसाद देते, हे आता पाहावे लागेल.
हे पण वाचा, महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी, मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक होणार एक सदस्य प्रभाग पद्धतीनं?
दरम्यान, निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह १० मनपांची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीत, तर महामारीमुळे मागील वर्षीपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, वसई-विरार या आधीच मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणूका यावर्षी ऑकटोबरमध्ये होऊ शकतात, असे नियोजन केलॆ आहे. त्यामुळे महापलिकांच्या प्रभागरचनेच्या कामाला येत्या १ जुलैपासून सुरुवात होणार असून, आराखडा तयार करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. यांनतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या १ महिन्याच्या कालावधीत, प्रभागरचनेबाबत कुणाला आक्षेप असेल किंवा हरकत असेल, ती नोंदवण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
Read Also :
- “कोणी कितीही शड्डू ठोकू देत, मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचाच”
- फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
- ‘गतवर्षी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची होणार याही वर्षी होणार पुनरावृत्ती’
- राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”