सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि सुटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेना- भाजपच्या वादाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हे मजा घेत आहेत – सदाभाऊ खोत
महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांचं वाक्य वाहून गेलं. आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय. सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणं अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नाही, असा विश्वासही पाटीलि यांनी यावेळी व्यक्त केलाय.
“…तर ईट का जवाब पत्थर से देंगे,” बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा
ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. पंढरपूर प्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार असा विश्वासही पाटील यावेळी व्यक्त केला आहे.
भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावला आहे.
Read Also :
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; शिवसेना- भाजपात नेमंक काय चाललयं?
- …तो पर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा अपरिमित हानी; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
- राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी; पहिले मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिली, आता आदित्य ठाकरेंकडून बक्षीस
- आपल्याच वहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं होतं..? नारायण राणेंचा रोख कुणाकडे?