बीड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हा शरद पवारांनी मुहूर्त पाहिला नव्हता. त्यामुळेच संकटांची मालिका सुरू झाली अशी खोचक टीका शिवसंग्रमाच्या विनायक मेटे यांनी केली आहे. हे पांढऱ्या पायाचं अपशकुनी सरकार आहे अशीही टीका बीड मधल्या पत्रकार परिषदेत विनायक मेटेंनी केली.
लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका
शरद पवार यांनी मुहूर्त बघितला नव्हता.जेव्हा पासून महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून संकटाची मालिका सुरू झाली हे पांढऱ्या पायाचं अपशकुनी सरकार आहे अशी घणाघाती टीका शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत या दोन वर्षांमध्ये सरकारची उपलब्धी म्हणजे सर्वांचा विश्वास घात केला. यात व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, मराठा ,ओबीसी मुस्लिम, आरक्षण यासंदर्भात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. कोणालाच न्याय देता आला नाही उलट हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रावर संकटाची मालिका सुरू झाली आहे म्हणून हे सरकार अपयशी अपशकुनी आहे असं विनायक मेटे म्हणाले. तसंच भ्रष्टाचारी महाराष्ट्र करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले तर धनंजय मुंडे यांनी बीडमधल्या जनतेला भ्रष्टाचारी बनवलं अशी टीका देखील मेटे यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री कसा नसावा हे दोन वर्षात सिद्ध केलं. ते परळी च्या बाहेर पडत नाहीत, ते फक्त एका मतदार संघाचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या कडून अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार चालवता त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी दोन वर्षात दोन मिनिट वेळ काढता आला नाही, यावरून सरकारची शिवाजी महाराज संदर्भात आत्मीयता दिसून येते मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण संदर्भात काहीच केले नाही,ओबीसी संदर्भात गळे काढले पण.काहीच प्रयत्न करत नाहीत.आम्ही ओबीसी च्या बाजूने आहोत. असे देखील आमदार विनायक मेटे म्हणाले
Read Also :
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
- संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका