सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या सुरु झालेली आहे. २१ तारखेला ही निवडणूक होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोसायटी गटातून विटा तालुक्यातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, शिराळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान मदार मानसिंगराव नाईक, पलूस तालुक्यातून काँग्रेसचे महेंद्र लाड हे तिघेजण बिनविरोध निवडणून आलेले आहेत. आता उर्वरित १८ जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षात संघर्ष बघायला मिळणार आहे. यामध्ये अनेक राजकीय दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे खासदार असणारे संजय काका पाटील यांनी थेट या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आपले दोन्ही गटातून भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
हे पण वाचा, जयंत पाटलांनी फिल्डिंग लावली, सांगलीत होणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’
जिल्हा बँकेत जाण्याचा त्यांचा मार्ग जरी थांबला असला तरीदेखील भविष्यात त्यांची स्वीकृत संचालक म्हणून देखील निवड करण्यात येऊ शकते आणि तसे संकेतही प्राप्त झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री, काँग्रेसचे नेते डॉ. विश्व्जीत कदम, शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी तिघांनी राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न या निवडणुकीत राबविण्याचा मानस केला आहे. तिघांनी जो काही जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये ते काहीसे यशस्वी झाल्याची चिन्हे समोर आली आहेत.
हे पण वाचा, “तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, पायावर उभं करण्याची जबाबदारी आमची” मुख्यमंत्र्यांचे सांगलीकरांना आश्वासन
महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. मात्र खासदार संजय पाटलांनी थेट माघारी घेतल्याने भाजपच्या गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. जर खासदार अर्ज मागे घेतात तर कार्यकर्त्यांनी काय करायचे ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. आता आगामी काळात होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा,
सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं; वर्धापनदिनी मुख्य संपादक राजीव खांडेकरांच्या भावना