मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष मोर्चेबांधणी आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेस-भाजपने याआधीच राज्यात स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी करून लढणार की एकत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या स्वबळाचा नारा दिला आहे.
शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?
“आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी होईलच असं नाही. काही ठिकाणी महाविकास आघाडी-भाजप अशी लढत होईल अशी परिस्थिती नाही. काही ठिकणी आम्हा तिन्ही पक्षांना एकमेकांविरुद्ध लढावे लागेल. गरज पडेल त्या ठिकाणी दोन पक्षांची, तीन पक्षांची आघाडी करावी लागेल. त्यामुळे, त्या-त्या स्थानिक नेत्याच्या आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊनच तिन्ही पक्ष निवडणुकांना सामोरं जाऊ. सध्या तरी निवडणुका मिळून लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?
दरम्यान, जाळण्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनीही, महाविकास आघाडीत सारं काही आलबेल असल्याच्या कल्पनांना सुरुंग लावला असून, “युती होणार नाही. ना विधानसभेत ना स्थानिक पातळीवर. झाली तर लोकसभेला होईल. तीही त्यांची गरज म्हणून, हा माझा अंदाज आहे आणि व्यक्तिगत मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत नाही. मग ३ पक्षांची कशी होणार? असा सवाल करत”, आघाडी आणि युतीबाबत सूचक विधान केलं.
मोदी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना अधिकारच किती? दानवे फक्त बोलघेवडे मंत्री, नवाब मलिकांचा हल्ला
त्यामुळे काही महिन्यांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर स्वबळाची भाषा केल्यामुळे तोंडसुख घेणार शिवसेना-राष्ट्रवादीतील नेते, आता स्वतः देखील स्वबळाची भाषा करू लागले असल्याने, एकंदरीत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वच पक्ष आपला जोर लावून निवडणूक लढणार असल्याचे चित्र दिसत आहेत. तसेच, निवडणूका लढवून स्वतःचे आणि इतर पक्षाचे राजकीय बलाबल किती आहे, हे देखील जोखून पाहणार आहेत, असे दिसून येत आहे.
Read Also :
- मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट
- “पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
- “खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज
- “लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान