अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील जांभळी, जांभूळबन व वावरथ या तीन गावच्या लोकांना सर्व प्रशासकीय कामासाठी राहुरी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यासाठी कोणताही रस्ता नसल्याने आणि पाण्याचा मार्ग असल्याने बोटीने प्रवास करणे असा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर राहतो. त्यातच यापूर्वी अनेक वेळा बोटीने प्रवास करताना अपघाताच्या घटना समोर आलेल्या आहेत. अपघातामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. आजही येथील लोकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
राहुरी तालुक्याला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले आहे. राहुरी तालुक्यातील कामांचा धडाका त्यांनी आता लावलेला दिसत आहे. मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी एक पूल बांधण्यात यावा यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सकारात्कम चर्चा पार पडलेली आहे. माजी खासदार प्रसादराव तनपुरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
सदरील बैठक अत्यंत सकारात्मक झालेली आहे. लवकरच राज्याच्या जलसंपदा खात्यामार्फत यासाठी तातडीने एक सर्वे करण्यात येणार आहे. याभागातील लोकांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे. त्याला तडा जाऊ न देता त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी माझे पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच हा पूल बांधला जाईल असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. हा पूल झाल्यास राहुरी तालुक्यातील जांभळी, जांभूळबन व वावरथ यागावांना तसेच पारनेर तालुक्यातील लगतच्या गावांना देखील फायदा होणार आहे.
Read Also :
- मुंबईत पावसाचे थैमान, नागरिकांनो सतर्क रहा; मुख्यमंत्र्यांकडून परिसराची पाहणी
- जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील
- आगामी महापालिका निवडणुक शिवसेना स्वबळावरच लढणार
- दुसऱ्या पक्षातील दिग्गज नेते शरद पवारांच्या प्रेमात पडलेतं – जयंत पाटील
- मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले