येत्या २०२१च्या विधानसभा निवडणूक आम्ही भाजपला पश्चिम बंगालच्या बाहेर फेकू. तृणमूल कॉंग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) च्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या , “केंद्र सरकारने आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगालचे लोक लवकरच त्याला योग्य उत्तर देतील. केंद्र सरकार बंगालविरूद्ध षडयंत्र रचत आहे की येथे दररोज हिंसाचार होतो, पण जंगल राज असलेल्या उत्तर प्रदेशचे काय? त्या राज्यातील लोक पोलिसांत तक्रार करायला घाबरतात. एकाच घटनेत अनेक पोलिस ठार झाले.
पश्चिम बंगालमध्ये बाहेरील लोक येऊन राज्य चालवणार नाहीत. राजकीय अनुभव नसलेले काही लोक जनतेचा जीव घेण्याच्या व वस्तूंचा नाश करण्याविषयी बोलतात. तसेच अम्फान चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या सर्व लोकांना सरकारी सहकार्य मिळेल, आमच्याविरूद्ध खोटी अफवा पसरविण्यात येत असल्याचे ममता यांनी सांगितले. देशभरात भीतीचे रहस्य असल्याने लोक बोलू शकत नाहीत