मुंबई : बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. आता हे प्रकरण वाढवण्याची शक्यता दिसत असून, मनसे नेते अखिल चित्रे ट्विट करत आता निलेश लंकेंवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे. या नोटीसनंचर अविनाश पवार यांनी व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंसह सर्व मनसे नेत्यांना आवाहन केले होते.
अब्रुनुकसानीची नोटीस आहे,कि खंडणीसाठीचं पत्र?
आपल्या ह्या बेकायदेशीर नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊच.@Nileshlanke333 ही लढाई आपण सुरू केली पण ही लढाई संपवणार आम्हीच हे निश्चित..@mnsadhikrut
#Defamation नाही #Blackmail #Extortion आहे. pic.twitter.com/67bopTugye— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) May 31, 2021
निलेश लंकेंनी नोटीस बजावल्यानंतर आता अब्रुनुकसानीची नोटीस आहे, की खंडणीसाठीचं पत्र?, अस सवाल मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.
अखिल चित्रे म्हणाले की, या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असा इशाराच निलेश लंके यांना दिला आहे.
दरम्यान, अविनाश पवार यांनी देखील निलेश लंकेंवर शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे अविनाश पवार म्हणाले.
Read Also :
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’