मुंबई : भारतातील लोकांनी मोदींना पाहून भाजपला मतदान केले. तर बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
मोदींकडे पाहून लोक मतदान करतात, इतर कोणाकडे पाहूनही मतदान करत नाहीत. हे भाजपालादेखील माहिती आहे. शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली, असे राज ठाकरे म्हणाले. लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, पूर्वीदेखील असंच होतं…अटलजी आणि अडवाणीजी हीच दोन माणसं होती. आता नरेंद्र मोदी आहेत. मोदींकडे पाहून लोक मतदान करतात.
मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो. कदाचित कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेन आणि माझे सहकारी यांच्या हातवाऱ्यांमुळे लक्षात राहत असतील. पण शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो, असे म्हणतानाच या देशात निवडणुका प्रतिकांवर लढल्या जातात असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा
- ‘मराठा आरक्षण आंदोलनात खासदार उदयनराजेंची पुढाकार घेण्याची तयारी’
- ‘चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही’
- लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार
- ‘जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच’