मुंबई : राज्यात लागू असलेले कडक निर्बंध हटणार की नाही यावरून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. मात्र, काही मिनिटांमध्येच मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
एकीकडे सरकारमधील मंत्र्यानेच अनलॉकची घोषणा केली. तर त्यानंतर काही मिनिटांमध्येच यासंदर्भातील प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगितल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावरून आता ठाकरे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील यावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णया मुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत. काही कळत की नाही तुम्हाला वा………
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 3, 2021
वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णया मुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत. काही कळत की नाही तुम्हाला, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली होती. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देखील दिली. परंतु, लॉकडाऊन हटविण्याबद्दलची अधिकृत घोषणा नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.
Read Also :
- ‘घरीच थांबा, शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’
- हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, मराठा आरक्षणाबाबत केली महत्त्वाची मागणी
- ‘नुसती स्तुती करू नये, गडकरींसारखे कामही करावे’
- मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय
- बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधेवरून मनसे आक्रमक