यवतमाळ: शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवारांकडे केली आहे.
हे पण वाचा: ठाकरे सरकारला आरक्षण द्यायचचं नाहीये, त्यामुळे वेळकाढूपणा चालू आहे – देवेंद्र फडणवीस
माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत. ठाकरे यांच्यासारख्या काँग्रेसमधील वजनदार नेत्याने शिवसेनेच्या मंत्र्याची तक्रार केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
हे पण वाचा: अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
ठाकरे म्हणतात….
शिवसेना ही यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला दु्य्यम दर्जाची वागणूक देत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. या जिल्ह्यात शिवसेनेचा फक्त एक आमदार आहे. असे असतानाही शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान न मिळाल्यानेही काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा: संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
‘आघाडीत बिलकुल धुसफूस नाही’
शिवसेना जिल्ह्यातील सर्व समित्यांवर वर्चस्व ठेवताना दिसत आहे. त्याची जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यानेच थेट मंत्र्याकडे तक्रार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आघाडीत धुसफूस असल्याचं वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळलं आहे. आघाडीत धुसफूस नाही. दोन भाऊ असले तरी भांडणं होत असतात. इथं तीन पक्षाचं सरकार आहे. मागील सरकारमध्ये शिवेसना आणि भाजपमधील भांडण आपण रोज पाहत होतो, असं वडेट्टीवार म्हणाले.
Read Also :
- दिल्लीत भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान
- मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट
- “पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
- “खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला