मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आझाद मैदानावर धडक मोर्चेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक तुरूंगात आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या या मोर्चोमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिक अजूनही मंत्रिमंडळात कसे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानावर मोर्चेचे आयोजन केले आहेत.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
आझाद मैदानावर भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात आसनव्यवस्था करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधातील हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सिग्नल पर्यंत निघणार आहे. भाजपाकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांकडून नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अगोदरच म्हटलं आहे की, नवाब मलिक यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही. त्यामुळे आगामी दिवसात राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
Read also:
- गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
- व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला