मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले असून, छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाच्या मनातील सरकारबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, अखेर राज्य सरकारकडून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे, आता राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांना १०% ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ठाकरे सरकारने नुकताच याबाबतचा शासन निर्णय काढून याची घोषणा केली आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्या समाजाला EWS मध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे, त्यामुळे जो गरीब मराठा वर्ग आहे, त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळेल,’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मारत समाजाला आवाहन केले आहे.
Read Also :
- ‘माझ्या लग्नाची एवढी चिंता का? चंद्रकांत पाटील यांच्याशी यासंदर्भात मी वेगळी चर्चा करेन’
- संजय राऊत यांची अवस्था “ना घर का ना घाट का”
- आम्हाला निवडणुकीची आणि पराभवाची भीती नाही, ज्यांना असं वाटत असेल ती त्यांची पोटदुखी आहे
- ‘चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला आहे, त्यांना…’ शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांची खरमरीत टीका
- कटकमिशनचे धंदे बंद करा! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरुन भाजपने केले शिवसेनेवर ४ गंभीर आरोप