सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला आले नाही. मात्र आमदार समाधान आवताडे यांनी पुढाकार घेतल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
सोलापूर शहरातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी मात्र नियम झुगारून आंदोलनाला सुरूवात केली आहे. शहरात २ हजार ग्रामीण भागात २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.
महामारी हद्दपार होतीये! पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद!
दरम्यान, राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला आहे.
Read Also :
- राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; महादेव जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- शिवसेना-भाजप एकत्र येणार?, अशिष शेलारांच्या भेटीवर संजय राऊत म्हणतात…
- सरकार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी अमित शहांना पत्र लिहिलं – रोहित पवार
- …तर शिवसेना पुन्हा भाजप सोबत युती करणार; सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- राज्याच्या राजकारणात होणार उलथापालथ? संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात मुंबईत गुप्त बैठक