कोल्हापूर : मराठा समाजासाठी संवेदनशील असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, लोकप्रतिनिधींना बोलतं करण्यासाठी आणि हा तिढा सोडवण्यासाठी, तसेच समाजाला त्यांचे हक्क न्याय्य आणि लोकशाही पद्धतीने मिळवून देण्यासाठी, आज संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा समाजाने, मूक मोर्चा काढून मराठा आंदोलनालाची सुरुवात केली. यावेळी या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.
हे पण वाचा, ‘आता वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही’
हे पण वाचा, धैर्यशील मानेंनी उंचावले आंदोलनकर्त्यांचे मनो”धैर्य”, हाताला सलाईन लावून लावली आंदोलनस्थळी हजेरी
दरम्यान, या मूक मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रतिक्रीया विचारण्यात आली. तेव्हा, ‘संभाजीराजेंनी आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करायला हवी होती. मात्र, आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ते जरुर करावं, फक्त यावेळी आजूबाजूची परिस्थिती बघता आपल्यामुळे महामारीचा प्रसार तर होणार नाही ना, याची देखील काळजी घ्यावी आणि मग करावं,’ असं वक्तव्य केलं.
हे पण वाचा, ‘मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी ‘अधिवेशनाच्या’ पहिल्याच दिवशी करणार’
हे पण वाचा, संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील
आज, पहिल्या मराठा क्रांती मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. तेव्हा संभाजीराजे यांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाष्य केले असून, ‘राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, या निमंत्रणाचं स्वागत आहे. पण, मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील, चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतरच यावर निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा, “आता दिल्लीलाही जाग येईल, मराठा आरक्षणावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी”- छत्रपती शाहू महाराज
हे पण वाचा, कोल्हापूरात भर पावसात मुक मोर्चाला, सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा
तसेच, ‘अजितदादांचा याआधी ४ जूनला देखील मला फोन आला होता. तेव्हा ते म्हणाले, “आपण मुंबईत भेटू.” मात्र, मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या मागण्या जाहीरपणे मांडल्या आहेत. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू, माहिती नाही समजा चुकून उद्या कुणी म्हटलंच, “ही सगळं काही मॅनेज झालं आहे” तर काय करायचं? त्यामुळे भेटायचं असेल, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजेत, सोबतच सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक देखील पाहिजेत, त्याचवेळी ही चर्चा होऊ शकते. तेव्हा आपण नक्कीच चर्चेला येऊ.’
Read Also :
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेचे उद्या १७ जून रोजी राज्यभर होणार आंदोलन
- भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू – निलेश राणे
- शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
- …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?