मुंबई : मराठा समाज देत असलेल्या, मराठा आरक्षणाच्या लढ्यात, आज मोठं यश हाती लागलं असून, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, जो मराठा समाज आक्रमक झाला होता, त्यांना अखेर आघाडी सरकारकडून, न्यायालयात पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करून दिलासा देण्यात आला आहे.
हे पण वाचा, देशात मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी होणार का? बाहेर आलं स्पष्टीकरण
यासंबंधीचे ट्विट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले असून, “मराठा आरक्षणबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात, राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिच्छेद देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे,” असे त्यांनी यात म्हटले आहे.
माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
हे पण वाचा, यांना आत्ताच गाडीत टाका आपण शिवबंधन बांधुयात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी संभाजीराजेंनी, सरकारने आपल्या बहुतांश मागण्या मेनी केल्या असून, त्यावर सकारत्मक हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच, राज्य सरकार येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचर याचिका दाखल करेल,” असे सांगितले होते.
Read Also :
- ‘मी भाजपचा कार्यकर्ता आहे, रेडिमेड आमदार नाही, हे मिटकरींनी लक्षात घ्यावे’
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाना पटोलेंवर नाराज? आघाडीत अस्वस्थता वाढली!
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश