मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून मराठा समाजामधून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडं हे आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत आघाडी सरकार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे आधीच्या सरकारने या आरक्षणात आधीपासूनच काही त्रुटी ठेवल्या होत्या, त्यामुळे प्रयत्न करून देखील हे आरक्षण आम्ही न्यायालयात टिकवू शकलो नाही, असा आरोप ठाकरे सरकारकडून भाजपवर केला जात आहे.
दरम्यान, या सगळ्या गोंधळात, मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, १ जून ते ५ जून दरम्यान मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची वल्गना, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. यातच त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती आपल्या फेसबुक पेज वरून देताना त्यांनी सांगितले, “५ मे २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले, त्यानंतर मराठा समाज हा खुल्या वर्गात गणला जातो. त्यानुसार खुल्या वर्गासाठी केंद्र सरकारने EWS आरक्षण लागू केले. परंतु, राज्याच्या सत्तेवर आलेल्या नतद्रष्ट आघाडी सरकारने १५ दिवस उलटूनही मराठा समाजाला EWS आरक्षण लागू केले नाहीये,” असं त्यांनी सांगितलं.
तसेच, “सरकारच्या या चालढकलपणामुळॆ मराठा समाजाच्या लाखो मुला-मुलींचे नुकसान होत आहे आणि याला पूर्णपणे अशोक चव्हाण आणि ठाकरे सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आणि EWS आरक्षण मराठा समाजाला लागू होण्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठामध्ये आज याचिका दाखल केली आहे, मला खात्री आहे सरकारने कितीही जरी अन्याय करायचा ठरवला तरी औरंगाबाद खंडपीठ न्याय दिल्याशिवाय राहणार नाही,” असं लिहीत त्यांनी आघाडी सरकारला न्यायालयात खेचले असल्याची कल्पना दिली आहे.
Read Also :
- ‘गृहविलगीकरणास बंदी’ निर्णयाचा फेरविचार करावा : आमदार महेश लांडगे
- “रीनैसंस द स्टेट” पुस्तकावर राज्यात आणि देशभरात बंदी घालावी, संभाजीराजेंकडून गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध
- त्यांनी कोविड सेंटरमध्ये नर्तकांना नाचवले तरी देखील चालते; मात्र आम्ही कोविड सेंटरमध्ये यज्ञ केल्याने आमच्या विरोधात तक्रार
- ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहणाऱ्या संभाजीराजेंसाठी वेळ नाही, पण अभिनेत्रींना भेटायला वेळ आहे’
- औरंगाबादच्या लॉकडाऊनवरून AIMIM आणि शिवसेना आमने-सामने