मुंबई: चाळीच्या जागी जेव्हा इमारती उभ्या राहतील, नवीन घरे मिळतील ती विकू नका. मुंबईतला मराठी टक्का घालवू नका, या ठिकाणचा मराठी आवाज टिकला, दिसला पाहिजे, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्किकास प्रकल्पाच्या भूमिपूजना वेळेस बोलत होते.
हे पण वाचा: “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी जांभोरी मैदानात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुंबईत उभ्या राहणाऱ्या ३०-४० मजली इमारतीत कष्टकरी वर्गाला जागा राहिली नसल्याची खंत व्यक्त केली. पवार यांनी व्यक्त केलेल्या भावनेचा धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले.
यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पुनर्विकासाच्या कामात करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अनेक आव्हाने होती. त्यातून मार्ग काढला असून, ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री सतेज पाटील यांचीही भाषणे झाली. या चाळींना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. पुनर्वसनानंतर यातील एका चाळीचे संवर्धन करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करावे. यातून भावी पिढ्यांना या चाळींचा इतिहास जाणून घेता येईल, अशी अपेक्षा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
हे पण वाचा: “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
एकेकाळच्या गिरण्या गेल्या. तिथे ४०-५० मजली इमारती उभ्या राहिल्या; पण त्यात कामगारांना जागा नव्हती. चाळींच्या जागी आता इमारती उभ्या राहून चांगल्या सुविधा असलेली घरे मिळतील. हा कष्टाचा ठेवा आहे, विकू नका. इथे मराठी आवाज दिसला, टिकला पाहिजे.
हे पण वाचा: “घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. चाळीतून टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका. मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका.
Read Also :
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
- “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
- तुम्ही बैठकीला बोलवा, आम्ही लगेच येवू; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा सविस्तर…